बुधवार, १८ ऑगस्ट, २०१०

संस्कृती टिकवाल तर ती टिकेल

यांना फक्त 'खळ्ळ खटाक'चा आवाज चांगला समजतो.प्रेमाने सांगितले तर समजत नाही. काल पासून काही मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखवायला सुरवात झाली आहे.हे फक्त मनसे ने आंदोलन केल्या नंतर झाले हे विशेष. पण या मुळे आपण लडाई जिंकलो असा होत नाही.निव्वळ ऑफिसमध्ये किवा घरी बसून मराठीच्या मुद्यावर गप्पा मारून स्वतः मात्र काही न करता मराठीला त्याचा काही फायदा होणार नाही आहे.


हे चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पहिले पाहिजेत तरच या आंदोलना काही अर्थ प्राप्त होईल नाहीतर त्यांना परत "मराठी चित्रपट पाह्यला कोणी येतच नाही तर आम्ही ते का लावावे" असे ओरडत बसतील. एकटेच नाही तर आपल्या परिवारासकट किंवा मित्रांना बरोबर घेऊन चित्रपट पाह्यला जा.जर तुम्हीच काही करणार नसाल तर इतरना दोष देण्यात काय अर्थ.अरे जरा गर्व बाळगा...मराठी असल्याचा! आणि ती टिकवण्यासाठी आपण स्वतः प्रयन्त करा. इतरची वाट कशाला बघता!

संस्कृती टिकली तर धर्म टिकेल .....धर्म टिकला तर मराठी टिकेल .....आणि मराठी टिकली तरच महाराष्ट्र टिकेल .....!!! जय महाराष्ट्र ......!!!!

सोमवार, १६ ऑगस्ट, २०१०

खरंच लाज वाटते का मराठी माणसाला मराठी असल्याची?

खरंच लाज वाटते का मराठी माणसाला मराठी असल्याची?




आपल्याच राज्यात मराठीचा आदर व्हावा म्हणून आंदोलन करावी लागतात.मग तो Radio FM वर मराठी गाणी लावण्याचा असो वा मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट लावण्यासाठीचे आंदोलन असो.बेळगाव मध्ये मराठी लोकावर होणार अत्याचार असू दे...मराठी लोक स्वत: एकत्र येत नाही.श्रीलंकेत तमिळ लोकावर अत्याचार होत आहेत म्हणून तामिळनाडूचे सरकार भारत सरकार वर दबाव आणते कारण तामिळनाडू मध्ये असलेला लोकांचा पाठिंबा.तिथे सर्व पक्षांना एकत्र यावे लागते या प्रश्नावर कारण तिथे असलेला लोकांचा दबाव.शिवसेना कधी मराठी साठी आंदोलन करते तर कधी मनसे पण हवा असा त्यांना कधी पाठिंबा मिळालाच नाही.१९६६ पासून मराठी साठी शिवसेना लढत होती पण त्यांना सत्तेवर येण्साठी १९९५ ची वाट बघावी लागली.ते सुधा त्यांनी हिंदुत्वाचा सहारा घेतला तेव्हा.अखेर त्यांना आपला पक्ष चालाव्याचा असतो उद्या फारसा मराठी लोकांचा पाठिंबा मिळाला नाही तर मनसे सुद्धा तेच करेल.



आज मराठी मुंबईतून हद्दपार झालीच आहे.उद्या इतर शहरातून ती होइल.संपूर्ण महाराष्ट्राची अशी अवस्था होऊ नये.मित्रानो मराठीचा वापर जितका जास्तीत जास्त होईल तितका करा.इंग्रजी जरूर शिका प्रगतीसाठी पण मराठीला विसरू नका.आज ही अनेक मराठी माणसे भेटल्यावर प्रथम हिंदीत

सुरवात करतात. आपल्याच राज्यात परक्यासारखे जगायला आपण आलो आहोत का.आपले अपयश दुसर्यावर ढकलून आपण मोठे होणार नाही.आपली भाषा समृद्ध होण्यासाठी आपण स्वत: ही जबाबदारी उचलायला हवी.१९६६ पासून शिवसेना काहीतरी करेल म्हणून वाट बघत बसलात आता की मनसे काही तरी करेल म्हणून वाट बघत बसणार आहात का तुम्ही.?

सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

संसदेच्या कॅन्टीन जे भाव बघा....

जरा तुम्ही कल्पना करा शाकाहारी जेवणाची थाळी फक्त रुपये १२.५०/- किवा दालची वाटी फक्त रुपये १.५०/- आणि चपाती फक्त १ रुपयाला एक आणि हे सर्व जेव्हा जेव्हा अन्नधान्यचे भाव गगनाला भिडले आहेत?


हो, हे होऊ सकते,भारतातील गरिबांना जिथे एका वेळचे अन्न मिळणे कठीण झाले असले तरी संसदेच्या कॅन्टीन मध्ये मात्र एकाहून एक अश्या लज्जतदार डिशेस एकदम स्वस्तात मिळतील.

जे खासदार संसदेत एकमेकावर ओरडत असतात आणि जे विरोधक सरकार वर वाढलेल्या महागाई वर टीका करत असतात, ते नक्कीच असे स्वस्तात मिळणारे खाणे आनदाने खात असतील.हे असे स्वस्तातले जेवण फक्त खासदार नाही, तर संसदेत काम करणारे कर्मचारी,सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकार सुधा लाभ घेतात, दाल जी आधी पर्यत गरिबाचे अन्न म्हणून ओळखली जायची ती आता इतकी महाग झाली आहे पण या कॅन्टीन मध्ये मात्र १.५० रुपयात तुम्हाला एक वाटी दाल मिळेल

पेट्रोल-डीजल चे भाव मात्र वेळो वेळी वाढवणाऱ्या या सरकारने हे भाव मात्र कधी २००४ नंतर कधीच वाढवले नाहीत

जरा खाली दिलेले कॅन्टीन जे भाव बघा....



चहा - रुपया १/-

सूप- rupaye ५.५०/-

दाल (एक वाटी) -rupaya १.५०/-

शाकाहारी थाळी-(दाल,भाजी,४ चपाती,भात किवा पुलाव,दही आणि सालाड) रुपये १२.५०/-

मासांहारी थाळी-रुपये २२/-

दही भात-रुपये ११/-

वेज पुलाव-रुपये ८/-

चिकन बिर्याणी-रुपये-३४/-

फिश करी आणि भात-रुपये १३/-

राजमा भात-रुपये ७/-

फिश करी-रुपये १७/-

चिकन करी-रुपये २०.५०/-

चिकन मसाला- रुपये २४.५०/-

बटर चिकन-रुपये २७/-

१ चपाती-रुपया १/-

भात -रुपया २/-

डोसा-रुपया ४/-

खीर एक वाटी-रुपये५.५०/-

फळाचा केक-रुपये ९.५०/-

फळाचे सालाड-रुपये ७/-

मित्रानो एकमेकाविरुद्ध भांडणे आता बंद करा,त्याचावर अंधळा विश्वास आता करू नका.ते सर्वजण सुखाने जगात आहेत.त्रास फक्त होतो आहे तो गरिबांना आणि सामान्य माणसाला.एवढे स्वस्त जेवण मिळवत असल्यामुळेच त्यांना लोकसभेत गोंधळ घालता येतो.जागे व्हा!.आता पाउल उचले तरच उद्या चांगले बदल दिसतील.

रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

विनंती विशेष-२

माननीय राष्ट्रपती,




माझ्या आधीच्या प्रत्राचे उत्तर काही मिळाले नाही..असो.पुन्हा पत्र लिहिण्यास कारण कि खेळामध्ये असलेला राजकारणी लोकाचा सहभाग.

सध्या राष्ट्रकुल खेळामुळे सुरेश कलमाडी यांचे नाव सर्वच channel वर आणि पेपर मध्ये दिसते आहे.ज्या माणसाने कधी क्रिकेट ची फळी कधी उचलली नाही ते शरद पवार आज क्रिकेट चे आतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत.कुणी खेळाडू का नाही?.ते भारतीय अध्यक्ष सुद्धा होते.कृषिमंत्री असताना त्याचाच महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकरी आत्महत्या करत असतात त्याने हे वेगळे पद का घायव्से वाटले?.



गरीब लोकांना पुरेल इतका गहू आज पाण्याखाली सडून जात आहे.आणि हे काही न लाज ठेवता सांगतात कि हे दर वर्षीच होते मग त्याचा इतका बाऊ का आता करता आहात.इतकी वर्ष हे खाते त्याचा कडेच होते मग अजून त्यावर काहीच उपाय योजना का नाही झाली.कि त्याचे लक्ष फक्त क्रिकेट मधील निवडणुकामध्ये होते.आता आतरराष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी प्रतप्रधानाडे विनंती केली माझा कामाचा बोजा कमी करावा. एवढेच जर त्याचाकडे काम होते तर त्यांनी क्रिकेट कडे का लक्ष दिले?.लालू प्रसाद यादवांनी सांगितल्या प्रमाणे हा गहू मुदाम सडून तो बियर बनवण्यासाठी वापरला जातो का?



त्याचा कामावर लक्ष तरी आहे का?.सुषमा स्वराज महागाई वर भाषण करत असताना ते हसत होते हे सर्वांनी पहिले आहेच.विरोधी पक्ष त्यावर त्यांना विचारात असतानाही त्याचे हसणे कमी झले नाही.इथे लोकांना जेवणाचे हाल होत असताना याचे जेवण बराच वेळ सुरु होते.त्यांना नंतर लोकसभेत यावसे वाटले नाही.



हे सर्व कधी पर्यत आम्ही सहन करायचे.?



एक त्रस्त भारतीय नागरिक



शैलेश राणे

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

विनंती विशेष

मी आतापर्यंत आमच्या नगरसेवकालाहि प्रत लिहिलं नाही आहे.पण का कौन जाने तूम्ह्लाला प्रत लिहावसे वाटले.




जेव्हा तुमची राष्ट्रपती म्हणून निवड झाली तेव्हा किती आनद झाला होता.एकतर प्रथमच महिला राष्ट्रपती आणि ती सुधा मराठी.



पण आज मी खूप निराश होऊन हे प्रत मी तुम्हला लिहित आहे.मुंबई किवा महाराष्ट्र बाहेर आम्ही गेलो नाही.त्यामुळे त्याचाबद्दल आम्ही फक्त वाचूनच आहोत.एकीकडे भारत आणि पाकिस्तानचा सीमाप्रश्न तर एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरु आहे.चंद्राबाबूने सुधा हैदराबाद आणि महाराष्ट्र वादात उडी मारून घेतली होती. १९६० साली आम्ही जन्माला आलो नव्हतो त्यामुळे त्यावेळी सयुकत महाराष्ट्राचे आंदोलन करून मिळवला मंगल कलश कशा मिळाला हे माहित नाही.पण त्यात १०६ हुत्मात्ने झाले हे आम्हाला माहित आहे.आज बेळगावात राहणाऱ्या मराठी लोकांवर अत्याचार केले जात आहे.तुम्हाला त्याविषयी काहीच वाटत नाही का?



आज मुंबईची वाटच लागली आहे.प्रचंड प्रमाणात येणाऱ्या लोन्द्यामुळे मुलुभूत सुविधाच मिळणे मुश्कील झले आहे.पाणी टंचाई,विजेचा प्रश्न,जागेच भाव तर गगनाला भिडलं आहेत.एका फुटाची किमत आज लाखात आहे.हे गरिबांना परवडणार कस.सरकारने तर मुंबईच विकायला काढली आहे

जागोजागी रस्त्यावर खड्डे आहेत.फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे.अगदी रेल्वेचा फूट ब्रिजवरहि.



आज मलेरियाने सर्वच मुंबईकरांना ग्रासले आहे. हॉस्पिटलमध्ये तर इतकी गर्दी असते कि इलाज होणार कधी? आज ट्रेन मधून किवा बसून प्रवास करणे म्हणजे जवळ जवळ नरक यातनाच.मागे आपले युवराज राहुल गांधीने प्रवास केला तो सुधा फिरस्त क्लास ने ते सुधा फारशी गर्दी नसताना सुरक्षा रक्षकाच्या गराड्यात.त्यांनी जरा सकाळी ८-.३० ते ११ किवा ५-८ मध्ये प्रवास करावा.आज बस मधला प्रवास म्हणजे सहनसाक्तीची सीमाच.ऑफिसमध्ये जाताना २ तास परत ९ तास काम करून येताना २ तास.मध्यम वर्गी लोकांचा संपूर्ण वेळ असाच जातो ते family ला कधी वेळ देणार.



मान्य करतो कि देशात कोणीही कुठेहि जाऊन राहू सकतो पण जे आधीपासून राहतात त्यांना त्रास होऊ नये इतकी तरी काळजी घावी कि नाही.उत्तरप्रदेश किवा बिहार मधल्या नेत्यांना आमचे प्रश्न समजणार नाही. म्हणून तूम्ह्ला ते सांगत आहोत.



आम्ही इतके मोठे नाही आहोत पण महाराष्ट्रात राहणर्या कॉमन man ला की त्रास होत आहे ते संग्साठी तुम्हाला प्रत लिहिले



काही चूक असल्यास शमा असावी



तुमचा एक त्रस्त भारतीय नागरिक