शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

भारत माझा देश आहे.

भारत माझा देश आहे.
इथे राहण्याऱ्या प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा प्रचंड अभिमान आहे.
इथे जात-पात,धर्म अजिबात मानला जात नाही.
इथला प्रत्येक शेतकरी हा श्रीमंत वर्गात मोडला जातो.
इथे भारतीय सैनिक आणि पोलीस यांना आमदार आणि खासदारांना पेक्षा जास्त वेतन मिळते.
इथल्या तरुणाचे हिरो नेहमीच भारतीय सैनिक आणि शेतकरी हेच असतात.
इथे राहणारा तरुण नोकरीसाठी कधी परदेशी जात नाही, जे काही करायचे ते देशासाठीच हाच त्यांचा नेहमी निर्धार असतो.
इथल्या प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल आणि आपल्या भाषेबद्दल प्रचंड प्रेम आहे.
इथला प्रत्येक जण आपले राज्य कसे पुढे येईल यासाठी प्रयन्त करत असतो त्याचमुळे भारत हे जगातील नंबर वन राष्ट्र आहे.
सरकार कडून फुकट मिळणाऱ्या गोष्टीला इथली जनता नेहमीच विरोध करते,त्यापेक्षा काम द्या असा त्यांचा आग्रह असतो.
म्हणूनच इथे बेरोजगारी शुन्य टक्के आहे. साक्षरता ९९% आहे तर गरिबी फक्त १% आहे.क्राईम रेट नाहींच्या बरोबर आहे.
इथे पाण्याचे उत्तम नियोजन केले जाते.
भारताच्या प्रत्येक गावागावात रस्ते पोहचले आहेत आणि जे जगातील उत्तम रस्ते मानले जातात.
इथली मीडिया सतत सकारत्मक बातम्या देत असते.
सरकार कुणाचेही असले तरी प्रत्येक निणर्य लोकसभेत आणि विधान सभेत एकत्र मिळून शांतपणे चर्चा करून घेतला जातो.
इथल्या लोकांना भारतात बनलेल्या वस्तूचे आकर्षण असते त्यामुळे परदेशी कंपन्या येथे जास्त टिकत नाही.
भारतीयाच्या यांचं प्रचंड देशप्रेमामुळे शेजारची शत्रू-राष्ट्रे नेहमीच आपल्याला वचकून असतात.
असा हा भारत माझा देश आहे.
@शैलेश राणे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: