मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

सचिनच्या निवृत्तीमुळे...........

सचिनच्या निवृत्तीमुळे आता देशाचे काय होणार असा एक नवीनच गंभीर प्रश्न सचिनच्या भक्तांना पडला आहे,गेली २३ वर्ष आपल्या भारत देशांनी जी अतोनात प्रगती झाली आहे ती फक्त सचिन मुळेच असा त्याचे ठाम मत आहे....पण आता काश्मिरच प्रश्न कसा सुटणार....शेतकरी बांधवाच्या आत्महत्या कश्या थांबणार...आणि मुख्य म्हणजे पेप्सी आणि कोकोकोला सारख्या गरीब कंपन्याचे काय होणार...मराठी चित्रपटाला ऑस्करवारी करता यावी म्हणून स्वतःची ब्याट देणारा दुसरा कोणता दानशूर क्रिकेटपटू महाराष्ट्राला भेटणार ...भेट म्हणून मिळालेली कार दुसयाला रग्गड दाम मोजून विकणारा उत्तम व्यावसाईक क्रिकेटपटू दुसरा कुठे जन्मला येणारा....सत्य साई बाबा साठी अश्रू ढळणारा असा अंधश्रद्धा विरोधी क्रिकेटपटू दुसरा कुठे असणार... असे अनेक प्रश्न/उपप्रश्न सचिनच्या भक्तापुढे उभे ठाकले आहेत.लवकरच त्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी अशा बाळगूया!!!....तूर्तास तरी कसोटी क्रिकेट आणि संत सोनिया गांधीच्या देशाच्या सर्वाधिक लोकप्रिय पक्षाच्या पाठिंब्यावर खान्ग्रेस्च्या इतर म्हणजे सर्वच देशभक्त खासदाराच्या मार्गदर्शन खालील सचिन उत्तम कामगिरी करेल अशा सचिनच्या भक्ताचा ठाम विश्वास आहे.

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

एकदम बरोबर आहे

Unknown म्हणाले...

एकदम बरोबर आहे