शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

या गोष्टीची काहीच चिंता नसेल तर....

त्यांनी तिच्यावर बलात्कार केला दिल्लीमध्ये...त्यांनी तिला पाठवले सिंगापूरला तिला मरण यावे म्हणून...आता आपले पंतप्रधान म्हणतात ती मेली म्हणून मी नवीन वर्ष साजरे करणार नाही.मेनका गांधी म्हणते ती जिवंतच नव्हती सिंगापूरमध्ये पाठवली तेव्हा...आरोपी अजून जिवंत आहेत जेलमध्ये मस्त बिर्याणी खात..न्यायाधीशाना माहित नाही कि ते फास्टट्रक कोर्ट चालवत आहेत कि नाही.सामान्य लोकांना कळत नाही आहे कि इतके नालायक सरकार सत्तेवर असून सुद्धा आपण त्यांना हटवू कसे शकत नाही....अण्णा हजारे,केजरीवाल,राज ठाकरे कुठे आहेत....नेहमी सरकार तोफ डागणारे आता का ते गप्प आहेत.लोक भारत आणि पाकिस्तानचे सामने बघण्यात आणि दबंग २ ला २०० कोटीचा पल्ला गाठून देण्यात मग्न आहेत.सचिनच्या एकदिवशीय सामन्यात घेतल्यामुळे अनेकांना दुख झाले आहे.

अरे बापरे या गदारोळात अजून १६ बलात्कार झाले आहेत...त्यापैकी ५ दिल्लीत झाले आहेत.नेहमीप्रमाणे त्यांची कोणालाच चिंता नाही आहे.महिला या देशात सुरक्षित नाही आहेत.वाचवा स्वतःला जर जमले तर...हे फक्त तुमच्याच हातात आहे.साजरे करा नवीन वर्ष या गोष्टीची काहीच चिंता नसेल तर....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: