मंगळवार, २० जून, २०१७

शहरी वर्ग vs.शेतकरी वर्ग

शहरी मित्र (तावातावाने ) - अरे तद्दन मूर्खपणा आहे हा... दूध आणि भाजीपाल्याची नासाडी करण्यापेक्षा गरिबांना वाटा,
शेतकरी मित्र (त्याला उत्तर देत) - म्हणजे तुम्हाला फुकट द्यायचं ना... भाजी घेताना ५-५ रुपयांसाठी घासाघीस करता तुम्ही पण तेच मल्टिप्लेक्स मध्ये ५ रुपयाचा पॉपकॉर्न ५० रुपयापासून १२० रुपयांपर्यंत घेता. जर योग्य भाव आमच्या मेहनतीला आम्हाला मिळाला असता नेहमी तर आम्ही असं कशाला केलं असते.
शहरी मित्र (पुन्हा तावातावाने)- अरे पण असं फुकट किती दिवस....सर्वच फुकट पाहिजे तुम्हाला
शेतकरी मित्र (पुन्हा तसच उत्तर) - तुम्ही नाही का घेत. तुमची ऐपत असताना सोडली होती का गॅस सबसीडी, कर बुडवायला कसली बसली खोटी बिले गोळा करत फिरत असतात आणि तुम्ही आम्हाला फुकटे म्हणतात. तुम्हाला एसी मध्ये बसून वर्षला चांगली पगारवाढ नाही मिळाली कसा राग येतो मग कंपनी लॉस मध्ये का असू दे. आमच्यासारखा उन्हात घाम काम करून बघा आणि आमच्या कष्टाला तसा योग्य मोबदला दिला नाही मिळाला तर काय करणार मग आम्ही शेवटी...

अशी दोन टोकाची मते गेले काही दिवस वाचून एवढच म्हणू शकतो कि ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बाकी भाजीपाला, दूध, अन इतर धनधान्य विकत घेताना भावाबाबत उगीच घासाघीस न करणे अन अडचणीत असलेल्या संपकरी वर्गास टोमणे मारून त्रस्त न करणे इतकंच सध्या तरी मी करू शकतो .
बाकी सर्व हुशार आहेत...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: