सोमवार, २८ फेब्रुवारी, २०११

ना भारत, ना इंग्लंड... खेळ जिंकला!

कालचा भारत आणि इंग्लंड मधील क्रिकेट सामना बघतील्यावर "अप्रतिम" हाच एकच शब्द वर्णन करण्यासाठी आतातरी मनात येत आहे.एक भारतीय म्हणून निश्चित वाईट वाटत आहे कि ३०० च्या वर धावा करून सुद्धा आपण जिंकू शकत नाही.एक हाती सामना जिंकून देणारा एकही गोलंदाज आपल्याकडे नाही तरी सुद्धा एक सच्चा क्रिकेट रसिक मात्र कालच्या सामन्याबद्दल नक्की म्हणेल कि काल कोणी जिंकले नसेल पण क्रिकेट नक्की जिंकला.अटीतटीचा सामना म्हणजे काय याचा शब्दश: थरारक अनुभव जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी नक्कीच घेतला असणार.तो थरार नक्कीच विश्वचषक स्पर्धेत प्राण आणणारा असेल.सचिन ने पुन्हा एकदा शतक ठोकले, काय बोलणार या माणसापुढे! एखाद्याची कमिटमेंट काय असते, ते याच्याकडे बघून कळतं. छे, याच्याबद्दल काही बोलणं व्यर्थ आहे. तो ग्रेट आहे, एवढंच म्हणून त्याचा खेळ बघायचा. सचिन तेंडुलकर या नावातच काहीतरी जादू आहे. तो खेळतो तेव्हा सगळा देश थांबतो.पण पुन्हा एकदा गोलदाजनी त्यांच्या शतकावर पाणी फिरवले.338 धावा करून जर आपण जिंकू शकत नाही तर आपली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण काय लायकीचं आहे हे समजते.तरी सुद्धा भारत यावेळी विश्वचषक जिंकेल असा वेडा आशावाद आपण ठेवायचा.किती सामने आपण असे फलदाजीच्या जोरावर जिकणार? ज्या बांगलादेशने आपल्या विरुद्ध २८३ धावा केल्या होत्या त्या बांगलादेशाला आयर्लंडने २०५ धावात गुंडाळले होते.जाऊ होते असे कधी कधी.धोनी काही तरी कमाल करेल आणि भारत या सामन्यामधून काहीतरी शिकेल आणि पुढे आपला खेळ उंचावेल अशीच आशा करूया.


सध्या फिरत असलेला हा खालील मेल सुद्धा वाचा

एक लडकी थी, दिवानी सी...

सचिन पे वो मरती थी...

चोरी चोरी, चुपके चुपके हरभजन को चिठ्ठीयाँ लिखा करती थी...

नजरे झुका के, शरमा के, गंभीर से बाते करती थी...

कभी कभी झुल्फे बिखेरके, सेहवाग की गलियो मे गुजरा करती थी...

कुछ कहना था शायद उसको रैना से, पर धोनी से वोह डरती थी...

जब भी मिलती थी युवराज से, बस यही पुँछा करती थी की,...

की,......

की,.....

कमीनों, वर्ल्ड कप कब जितोगे??

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: